janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
कल्याणदेश

कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये किती पाकिस्तानी राहतात?

Last updated: April 27, 2025 5:34 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
SHARE

भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे…

काश्मीर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सत्तावीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा संतप्त नागरिकांनी दिल्या. त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा तातडीने पावलं उचलत अनेक निर्णय घेतले. त्यापैकी भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांची शोधाशोध आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांच्या माध्यमातूनही सुरू करण्यात आली … कल्याण डोंबिवली शहरात म्हणजेच झोन ३ मध्ये सध्या शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून शून्य नागरिक वास्तव्यास आहेत तर उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ विठ्ठलवाडी या परिसरात म्हणजेच परिमंडळ चार मध्ये एकूण 17 नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती झोन 4 चे डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. लाँग टर्म व्हिसा बाबत अजून काही आदेश आले नाहीत.

आदेश आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल असेही गोरे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे हे सर्व नागरिक सिंधी समाजाचे आहेत. फाळणी नंतर तिथून निर्वासित होऊन आलेले सिंध प्रांतातील हिंदू, म्हणजेच आपण ज्यांना सिंधी म्हणतो ते लोक. काही सिंधी समाजाचे बांधव विशेषतः उल्हासनगर आणि इतर परिसरामध्ये वास्तव्यास राहिले. विस्थापित होऊन आल्यामुळे एकाच कुटुंबातल्या लोकांची फाटाफूट झली होती. मात्र त्यांचे काही नातलग हे पाकिस्तानात राहतात.

त्यानंतर पाकिस्तानातून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येण्याचा सिलसिला सुरू झाला. या नातेवाईकांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सिंधी समाजाचे लोक भारतामध्ये आले होते. या सर्वांना आता भारत देश लवकरात लवकर सोडावा लागणार आहे. झोन 4 मधील बहुतांश नागरिक हे रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी भारत सोडणार आहेत तर उर्वरित नागरिक हे 28 तारखेला पाकिस्तानच्या दिशेने रवाना होणार आहेत. जोपर्यंत लाँग टर्म व्हिसाबाबत केंद्र शासनाकडून काही निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पाकिस्तानी नागरिकांना भारतात राहण्याची मुभा आहे.

TAGGED:उल्हासनगर पाकिस्तानी नागरिककल्याण पाकिस्तानी लोकसंख्याडोंबिवली पाकिस्तानी रहिवासी
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article nine vehicles crushed in a collision between ready mixer vehicles in vijayanagar kalyan east कल्याण पूर्वेत रेडी मिक्सर अपघातात ९ वाहने चिरडली, ३ जखमी
Next Article suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1 सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?