पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केलं आहे. ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची सुरुवात आहे. भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे? ते जाणून घ्या.
आता थांबू नका, कारवाई सुरू ठेवा
संपूर्ण POK ताब्यात येईपर्यंत आणि शेवटचा आतंकवादी मारला जाईपर्यंत ही लढाई अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
तिकडे पाकड्यांचे तर इकडे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले
छत्तीसगड राज्यात सीआरपीएफ व डीआरजी पोलिसांच्या संयुक्त अभियानात वीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ऑपरेशन गरुडा जवळपास पंधरा दिवसापासून छत्तीसगडच्या करेगट्टा पहाडीवर सुरू आहे . आज पंधरावा दिवस असून आज पहाटे सीआरपीएफ छत्तीसगड पोलिसांनी 20 ते 22 नक्षलवाद्यांना ठार मारले.
मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री आमित शहा बैठक संपवून बाहेर पडले आहेत. यावेळी त्यांनी लष्कराचे कौतुक केले.
2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर
लवकरच भारताचं स्पेस स्टेशन असेल. 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल, अशी मोठी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. प्रत्येक भारतीयांसााठी सॅटेलाईट काम करणार असे ते म्हणाले.
बलुचींकडून आनंदोत्सव
भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पंजाब प्रांतातील लाहोरजवळील दहशतवादी स्थळांवर भारताने एअर स्ट्राईक केला. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर बलुचिस्तानमध्ये बलोच नेत्यांनी आणि नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. खास पांरपारिक गीतांवर त्यांनी ठेका धरला.लपण्यासाठी कुठेही जागा नाही, लक्षात ठेवा-इस्त्रायल
दहशतवाद्यांना लपण्यासाठी कुठेही जागा नाही, हे लक्षात ठेवा असा इशारा देत इस्त्रायलने भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले. त्यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दिला.
मुजफ्फराबागमधला लष्कर – ए – तैयबाचा सवाई नल्ला कॅम्प उद्ध्वस्त.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर… 9 ठिकाणी हवाई हल्ला… मुजफ्फराबागमधला लष्कर – ए – तैयबाचा सवाई नल्ला कॅम्प उद्ध्वस्त… याठिकाणी 50 ते 100 अतिरेकी नेहमी उपस्थित असायचे.
हातात तिरंगा घेत, नागरिकांना पेढे भरवत पिंपरी चिंचवडच्या थरमॅक्स चौकात आनंदोत्सव साजरा.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते झाल्याचं कळताच पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष करण्यात आला… थरमॅक्स चौकात किर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला… यावेळी हातात तिरंगा घेत, भारत माता की जय, लष्करी सेनेचा विजय असो असे नारा लावण्यात आले. चौकाचौकात नागरिकांना पेढे भरवत शहरवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
कोणत्याही नागरिकांचा यात मृत्यू झाल्याचा रिपोर्ट नाही
“कोणत्याही सैन्य ठिकाण्याला निशाणा करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही नागिरकांचा यात मृत्यू झाल्याचा रिपोर्ट अद्याप समोर आला नाही,” असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत नऊ दहशतवादी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं- कर्नल सोफिया कुरेशी
“पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना टारगेट केलं गेलं. या तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय”, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाककडून भारताविरोधात पुढेही हल्ले होऊ शकतात, अशी गुप्त माहिती
“भारताविरोधात पुढेही हल्ले होऊ शकतील, त्यामुळे त्यांना रोखणं आणि प्रत्युत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी दिले”, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.
पहलगाम हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड
“एका समूहाने स्वत:ला TRF म्हणत पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले आहेत”,अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
“पहलगाम हल्ला काश्मीरमधील स्थिती बाधित करण्यासाठी होता”
“पहलगाममधील हल्ला हा अत्यंत निर्दयी होती. कुटुंबीयांच्या समोर पर्यटकांना गोळ्या झाडल्या गेल्या. हा हल्ला स्पष्टपणे जम्मू-काश्मीरमधील सामान्य स्थितीला धक्का पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या पर्यटनाला नुकसान पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या विकास आणि प्रगतीला नुकसान पोहोचवायचं होतं,” असं पत्रकार परिषदेत म्हटलं गेलं.