janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन

Last updated: May 7, 2025 9:46 am
By जनवृत्त
Share
4 Min Read
बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन
SHARE

मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे पण अजूनही गरिबाला घर नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.
प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, काश्मीर हल्ला अशा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं. अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.

संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी मी एका टीव्हीवर सिरीयल पाहिली आणि संतांजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांना दिला पाहिजे, असे मला वाटले. कारण कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालूच शकत नाही. त्यामुळे त्यांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं, अशी माहिती कडू यांनी दिली.

तीन बंदरासारखी व्यवस्था…

“गिरता वही है जो रुकता है. बच्चू कडू रुकने वाला नही है. दौडने वाला है. पराभव झाला हे डोक्यातून काढून टाका. अजित पवार म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस हे बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदेंना तर कानच राहलेले नाहीत. तीन बंदरासारखी व्यवस्था निर्माण झाली आहे. एकाचे डोळ्यावर बोट आहे, एकाचे कानावर बोट आहेत आणि एकाचे तोंडावर बोट आहे,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे पण अजूनही गरिबाला घर नाही. अजितदादाला 55 हजार पगार होता. आज मात्र अजित पवार अडीच लाख रुपये मानधन उचलतात, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय…

आमदाराला तीन हजार रुपये रोज आणि MRGS मजुराला फक्त 200 रुपये रोजंदारी दिली जाते. निवडणुकीत फडणवीस म्हणाले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अजितदादा बोलत नाहीत, फडणवीस तर काहीच बोलायला तयार नाही आणि शिंदें साहेबांना काहीच ऐकायला येत नाही. ह्या तिन्ही बंदरांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली.

…किमान आता वेळ तरी मिळत आहे

56 इंचापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी आहे. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्षे भाजपाचे गेले. पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशीच आहे. बरं झालं मी निवडणुकीत पडलो, किमान आता वेळ तरी मिळत आहे. बच्चू कडूची ताकत बच्चू कडूमध्ये लपली आहे आमदारकीमध्ये नाही. अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारीही त्यांनी दिला.

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई

15 दिवसांत तारीख नाही सांगितली तर…

5 जूनला आपण मोटारसायकल किंवा गाडीने यवतमाळला ताकतीने जाणार आहोत. तिथून आपण नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाणार आहोत. पालकमंत्री बावनकुळे म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ पण तारीख सांगत नाहीत. जर 15 दिवसांत तारीख नाही सांगितली तर तुमचे चाक आम्ही अडवू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरीला 7 जून पासून मी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीच तोपर्यंत मी त्याठिकाणीच थांबणार आहे, असा थेट इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला त्याठिकाणी जर आपले दोन-तीन जवान असते तर त्यांचा तिथंच खात्मा झाला असता. जिथं गर्दी होती. त्याठिकाणी सुरक्षा नव्हती. म्हणतात मी चौकीदार आहे. पण यांच्या काळातच सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

TAGGED:अजित पवारआंदोलनपंकजा मुंढेबच्चू कडूमराठी राजकारणराजकीय संघर्षविरोध आंदोलनसंजय राठोड
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार | 9 ठिकाणी हवाई हल्ला लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार | 9 ठिकाणी हवाई हल्ला
Next Article ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी
राजकारण

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी

January 19, 2025
Now Iran entry in India Pakistan dispute made a big statement
राजकारण

भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य

April 27, 2025
प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
राजकारण

प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर

May 20, 2025
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं
राजकारण

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं

January 19, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?